महाराष्ट्राचे सर्वात लाडके दैवत म्हणजे गणपति. गणपतीचे हे आगळे-वेगळे रूप मनाला आकर्षित करणारे आहे. दरवर्षी सर्वांना ह्या उत्सवाची उत्सुकता असते. मग तो सार्वजनिक गणेशोत्सव असो की घरी येणारा हा गणराया असो. ‘ गणपति बाप्पा मोरया ’ चा नाद गल्लोगल्ली कानावर पडू लागतो. सर्वांच्या मनामध्ये एक भावना जरूर असते कि गणरायाच्या आगमनाने आमच्या जीवनातले सर्व विघ्न आता दूर होणार. ह्याचा वरद हस्त आमच्यावर राहील्याने आमचे जीवन सुरळीत होणार.
कोणी दीड दिवसाचा गणपती तर कोणी पाच किंवा सात दिवसाचा तर कोणी अकरा दिवसांचा गणपति घरी बसवतात. प्रेम-भावनेने त्याची आराधना करतात. मोदकाचा खास नैवेद्य दाखवतात. हे सर्व कार्य मनोभावे केले जाते. ज्या भावनेने पूजा अर्चा केली जाते त्या अनुसार मनोकामना ही पूर्ण होण्याचा अनुभव आपल्या सर्वांकडे असेलच. असे ह्या देवता मध्ये काय आहे ? ज्या मुळे आपल्या जीवनातील विघ्न दूर होतात ? प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात गणपति वंदनेने केली जाते कारण गणरायाचे रूप जर व्यवस्थित न्याहाळले तर प्रत्येक अंग गुणांनी भरलेले आहे. म्हणूनच गणपति म्हणजे गुण-पति असे ही म्हटले जाते.
जीवनामध्ये जेव्हा विघ्न येतात तेव्हा मनुष्याचा कल पूजा-अर्चा, उपवास, नवस ….. ह्या सर्व गोष्टीकडे जातो पण आपल्या जीवनातले विघ्न दूर करण्यासाठी आपल्यालाच अचूक पाऊल उचलावे लागते. विघ्न विनाशक बनण्यासाठी गणराया सारखे बनावे लागेल. आपल्या सर्वाना गणेशाची जन्म कथा माहितच असेल. पार्वतीच्या मळाने एका पुत्राचा जन्म होतो. शंकर आपली तपस्या पूर्ण करून जेव्हा परत येतात तेव्हा पार्वती स्नान करायला गेली. अश्या वेळी ह्या पार्वती नंदनाला बाहेर बसवून तसेच ताकीद देऊन गेली होती कि कोणी ही आले तरी त्यांना आत पाठवायचे नाही. जेव्हा शंकर आत जाऊ लागले तर ह्या पुत्राने त्यांना अडवले. शंकर ह्यांना प्रश्न उठला कि हा कोण जो मला अडवतोय ? रागात येऊन ते ह्या पुत्राचे शिश धडापासून वेगळे करतात. पार्वती अंघोळ करून बाहेर येते तेव्हा झालेला प्रकार बघून त्यांना सांगते कि मीच त्याला सांगून गेले होते. हा आपलाच पुत्र आहे. काही ही करा पण ह्याला कोणाचे ही तोंड लावून जीवंत करा. तेव्हा शंकरजी हत्तीचे तोंड ह्या मुलाला लावतात आणि ह्याच शिवपुत्राचे नाव ‘ गणपति ’ असे ठेवले जाते.
हत्तीचेच तोंड का ? हा प्रश्न सर्वांच्याच मनात उभा राहिला असेल. हत्तीला बुद्धीवान, बलवान, आज्ञाधारक ….. मानले जाते. हत्तीच्या प्रत्येक अंगामध्ये रहस्य आहे. सुपासारखे कान हे चांगले आणि वाईट ह्यांचा भेद करून चांगले आपल्या जवळ ठेवण्याची कला शिकवणारे आहे. वाईट ऐकण्याची सवय ही आपल्या जीवनाला चुकीच्या मार्गावर घेऊन घेऊन जाऊ शकते. म्हणून Hear no evil ही गाठ आपण बांधावी. शरीर इतके मोठे मात्र डोळे किती छोटे. दूरची वस्तू बघण्यासाठी आपल्याला डोळे छोटे करावे लागतात. हे डोळे दूरदृष्टीचे प्रतिक आहे. कोणते ही कार्य करण्यासाठी त्याचे होणारे परिणाम पहिले लक्षात घ्यावे. कारण आजचा मनुष्य पहिले करतो आणि मग त्यावर विचार करत राहतो परंतु पहिले विचार करावा व मग कार्याला लागावे ही सवय आपण स्वतःला लावावी. हत्तीचे सोंड ही बलशाली असण्याचे प्रतिक आहे. ह्या सोंडेने भले मोठी झाडे मुळासकट उपटून काढली जातात. ह्याच सोंडेने देवाला हार ही अर्पण केला जातो. ह्या सोंडेमध्ये कोणी ही काहीही दिले तर ते मालकापर्यंत पोहोचवण्याची इमानदारी ही दिसून येते. अशक्य कार्य शक्य करण्याची शक्ति हत्तीमध्ये दिसून येते. मानवी मनामध्ये सुद्धा अद्भुत शक्ति आहे ज्या द्वारे असम्भव कार्य सम्भव होऊन जातात. तसेच नम्रता आणि इमानदार राहिल्याने जीवनातल्या समस्या कमी होतात.
ह्या गुणांचा वापर दैनंदिन कार्यामध्ये आपण केला जसे दूरदृष्टी ठेवून जे आवश्यक आहे तितके ऐकणे, बोलणे ….. ह्यावर अटेन्शन ठेवले तर वेळेचा सदुपयोग तर होईलच पण व्यर्थ गोष्टींपासून मुक्त ही होऊ. आपल्यामध्ये जे गुण आणि शक्ती आहेत त्यांचा व्यर्थ व्यय न करता खऱ्या मार्गाने वापर केला तर विघ्न कमी येतील आणि जर परिस्थिती आलीच तर त्याचा सामना पण करू शकतो.
ह्या गणेशोत्सवानिमित्त आपण आज संकल्प घेऊ या कि रोज ह्या गणरायाचे दर्शन करून त्यांचे सर्व गुण आणि शक्ति मला माझ्यामध्ये आणायचे आहेत. मी स्वतःला इतके शक्तिशाली बनवेन की किती ही विघ्न आली तरी ती ह्या शक्तिंनी समाप्त होतील. मी सुद्धा गणपति सारखे गुणांनी स्वतःला भरपूर करीन.
10 Comments
how to get money
paroxetine 10 mg
self help essay
motrin 800 mg prescription
pilex tablets online
perfect cover letter
where can i get generic viagra online
cvs dapoxetine generic dapoxetine cost https://salemeds24.wixsite.com/dapoxetine
generic tadalafil 40mg
uroxatral cost